रविवार, १८ एप्रिल, २०१०

खानला जेव्हा जाग येते.

 पाकिस्तानी चांगले आहेत यावर दुमत झाल्याने (कोण रे तो आडवा येणारा?) खान महाशय वैतागले आहेत. अरे काय म्हणायचे या मागासवर्गीय / कर्मठ / सनातनी/ पुरुषप्रधान / वर्न्याकुलर इ लोकांना ? खानाने   त्याच्या दोन नम्बरच्या  पत्निसोबत (वाचा करण जोहर) मिळून जगात चुकीच्या मार्गावर गेलेल्या  अमेरिकी प्रशासनाला  काहीतरी माणुसकी वगैरे समजावी या उद्दात्त हेतूने चित्रपट बनविला मग तर भारतात त्यास पाकिस्तानी लोकांबद्दल असलेला द्वेष मिटवता येऊ नये म्हणजे काय? त्याने आवेशात जाहिर केले की यापुढे पाकिस्तान द्वेष बंद म्हणजे साफ़ बंद. पाकिस्तानी माणसे काही अतिरेकी कारवाया करीत नाहीत असे ठणकवुन सांगताना त्यास थोड़ीही वर लिहिलेल्या मागासवर्गीय / कर्मठ / सनातनी/ पुरुषप्रधान / वर्न्याकुलर इ लेकांची भीतीवगैरे  वाटली नाही.  खान बहाद्दुर आहे असा बोलबाला मुम्बापूरीत वादू लागला, मग काय म्हणता. त्या नादान कोत्या वृत्तीच्या लोकांना म्हणे मुम्बैवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध म्हणून पाकिस्तानी क्रिडापटू,  कलाकार आणि समर्थक यांना भारताची दालने बंद करावीत असे काहीसे वाटू लागल्याने खानाचा एकंदरीतच प्लान कोलमडाया  लागला की हो. त्यावर खानाने आरोळ  ठोकली की इतरान्नी  केले तर चालते  मग मी मुसलमान असल्यानेच ही हिन्दू बहुसंख्य जमात मला विरोध करते आहे. अनेक जणांनी  खानास समजावले पण नाही. खानाने शेवटचे सांगितले की एक्वेळ मी माझे सुपरस्टार पद सोडीन पण माझा तत्वावरील विश्वास कध्धीकधी सोडणार नाही.  आपल्या चित्रपटाचा शो अरब देशात लोकप्रिय होतोय याचाही आनंद बिच्चारा खान घेऊ शकत नव्हता म्हणजे बघा किती त्रास. पण शेवटी सगळे गोड  झाले.  नादान लोकांना त्यांची चूक समजली. चित्रपट़ास विरोध करून खान बध्रणार  नाहीं किंवा तो कशालाही बधणार नाही.   त्याला एकाच गोष्टीचे वाईट वाटते ते की अमेरिकेत त्याच्या छोट्या खानान्ना  वेगळ्या लाइनीमधे उभे केले जाते. तुमचे आमचे आड़नाव साधे  जुनाट हिंदी चित्रपटातील सुपरस्टार प्रमाणे नाही याचा आनंद मनवत असाल  तर खुशाल मनवा. आम्म्ही खान नाही याचा आम्हाला फायदा होतो हे खानालाही समजले असेल एवढीच अमेरिकेच्या चरणी प्रार्थना आणि जागतिक दहशतवादाविरुद्ध (उर्फ़ जेहादविरुद्ध ) लढण्याच्या शुभेच्छा.  त्यात पाकिस्तानातील चांगल्या लोकांना मात्र इजा पोहोचू नये एवढीच आशा.   फार मोठी आशा करत नाही.    

रविवार, ३ जानेवारी, २०१०

कोणता झेंडा घेऊ

अरे  वेड्यांनो, हात किती ? २. झेंडे किती? २. मग प्रश्न का?  कोणता झेंडा घेऊ हाती का? सध्याचे राज्य असे आहे की कार्यकर्त्यास कमीत कमी २ ते ३ झेंडे निवडणूकीच्या आधी आणि एखादा अपक्ष असे चार झेंडे बाळगावे लागतात. जर शिवसेनेच्यावर प्रेम असणारा कार्यकर्ता असेल तर त्याला प्रश्न पडण्याचे कारण नाही.   मतदार खरे प्रश्नात पडतात की कोणाला मत देऊ कारण एकालाच मत द्यायचे असते ना? छगन भुजबळ ह्यांच्या जाण्याने कार्यकर्त्यात जो संताप झाला होता तेव्हा कोणालाच हा प्रश्न पडला नाही. राष्ट्रवादी जेव्हा कांग्रेस पासून वेगळी झाली  तेव्हा कांग्रेस कार्यकर्त्याचा २००० मध्ये असा संभ्रम झाला नाहीं. बरे सेना आणि मनसे ह्यानी दोन निवडणूका लढवल्या आता कोणालाच झेंडा कोणता हाती घेऊ असा संभ्रम असण्याचे कारण नाही.  सेना छटपूजा साजरी करते मनसे नाही सेना अमराठीना लोकसभेवर पाठवते मनसे अजूनपर्यंत तरी नाही.  सेना मराठी माणसाच्यासाठीच आहे असा 'नक्की' विश्वास वाटत नाही तेव्हाच मतदार मनसेकडे वळतात.  सेनेचे आक्रमक रूप भावलेले मनसेकडे वळतात. सेनेत नाराज असलेले मनसेकडे वळतात. पण तसेच  मनसेतून लोकसभेच्या निवडणूकीनंतर  श्वेता परुळकर, प्रकाश महाजन "कोणता झेंडा घेऊ हाती ?" विचारतच परत सेनेत आले ना ?  लोकांचा ह्या राजकीय सर्कशीवराचा विश्वास उडाला असून "कोणता झेंडा घेऊ?" विचारणाऱ्याची दया त्यांना येईलच असे सांगता येत नाही.  देशात एवढे राजकीय झेंडे आहेत की हात कमी पडतील ? मराठी माणसाच्या हिताचा झेंडा मतदारांनी अजूनपर्यंत हाती ठेवल्यानेच ह्यांचे गाणे एवढे त्रासदायक वाटत नाही.  एक गोष्ट कार्यकर्त्यानी  समजून घ्यावी की महाराष्ट्राच्या राजकारणात कोणताही झेंडा असू देत त्याचा उद्देश एकच असावा. महाराष्ट्रवाद. जो पर्यंत तो टिकेल तोपर्यंत मतदान "रोटी कपड़ा मकान" असल्या लेवल पर्यंत जाणार नाही. (प्रत्येक M .P. आपल्या भागासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा फायदा घेउन "बिजली सड़क पानी" देण्यास बांधील असतोच).