शनिवार, २ एप्रिल, २०११

क्रिकेट २०११

भारताने विश्वचषक जिंकून दिवस गाजवला. सर्व टिम मधील खेळाडू, प्रशिक्षक, मॅनेजर्स, फिटनेस राखणारे, साधी कामे करणारे आनंदाने नाचले. स्टेडियमवर तर गणपती बाप्पा मोरयाचा गजर सुरु होता. भारताच्या राष्ट्राध्यक्षा प्रतिभा पाटील, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष राजेपक्षे, खा. राहुल गांधी, आमीर खान, मुकेश अंबानी, रजनीकांत, प्रीटी झींटा (आई गं) ई मान्यवर वेळात वेळ काढून वानखेडेवर खेळ बघताना टिव्हीवर दिसले. महेन्द्रसिंह ढोणीने कॅप्टन म्हणजे काय असतो हे दाखवून दिले. सचिन व वीरेन्द्र २० च्या आत परतल्यावर दडपणाखाली खेळत केवळ एकेक रन घेत त्याने व गंभीरने तीन आकडी लक्ष्याचे दोन आकड्यात रुपांतर कधी केले हे संगकाराला कळले नाही. शेवटी पॉवरप्लेमधे त्याने व युवराजने फोर आणि सिक्स दणकावत टप्पा सोपा केला. आपल्या विकेट्स राखल्या हे त्यांचे श्रेय.  सचिनचा खेळ शेवटच्या मॅच मधे शतक झळकावणारा नसल्याने थोडी निराशा झाली. पण ६ विश्वचषक खेळलेला एकमेव भारतीय खेळाडू विश्वविजयी संघात आहे हे महत्वाचेच. सर्वांचे अभिनंदन. खास गॅरी कर्स्टन आणि  व्यंकटेश प्रसाद या प्रशिक्षकांचे. भारतीय महासत्ता अशीच सर्व क्षेत्रांत विश्वविजयी होत राहो आणि त्यात सर्वांचा वाटा राहो ही सदिच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा